सावित्रीबाई फुले -बालिका दिवस
3 जानेवारी २०१७ बालिका दिवस
******************************************
" लेक शिकवा अभियान "
*****************************
"बेटी बचाव बेटी पढाओ"
★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★
●सावित्रीबाई फुले यांच्या विषयी थोडक्यात●
★★★★★★★★★★★★★★★★
सावित्रीबाई फुले (जानेवारी ३, इ.स. १८३१ – मार्च १०, इ.स. १८९७) या शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक
टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
◆!!! चरित्र !!!◆
सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जानेवारी ३, इ.स. १८३१ रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्या वडिलांचं नाव
खंडोजी नेवसे पाटील. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात
सावित्रीबाईंचा जन्म झाला. पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत सुरुवात
केली. एका दुबळ्या मुलाचे फुल हिसकावून घेणार्या धटिंगणाला त्यांनी अद्दल घडविली, तर पक्ष्यांची अंडी खाणार्या नागाला त्यांनी ठेचून मारले.
फाल्गुन कृष्ण पंचमी, शालिवाहन शक १७६५ (इ.स. १८४०) रोजी ज्योतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. म्हणजे त्या वेळच्या
रूढीनुसार लग्नाला उशीरच झाल्याचे मानले गेले. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे
मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली
म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव
मिळाले.
सावित्रीबाईंचे
पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण
सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केलेला. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्याच्या
मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचं व बोलताही यायचं.
त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला.
ज्योतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्यांनी
लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या.
‘त्यांनी करेल
ते र्मों आणि आपण शिकलो की पाप’ हा ज्योतिरावांनी वडिलांना विचारलेला प्रश्र्न सावित्रीला पतीच्या
ध्येयाची जाणीव देऊन गेला. ‘सेठजी, टाकलं पाऊल मागं घेऊ नका. तुमी शिकावं असं मलाबी वाटतं’…. या शब्दात त्यांनी पतीला ताकद दिली. ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला .
त्यांनी स्वत: शिकून
सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक
शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या.
पुढे भिड्यांच्या वाड्यात शाळा सुरू झाल्यानंतर सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात
आले. ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. त्या काळात लोक म्हणत जो शिकेल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील. त्यावर उपाय म्हणून त्यांना
सांगण्यात आलं की “गोर्या साहेबानं एक शोध लावलाय
की, जो शिकणार नाही
त्याच्या चौदा पिढ्या नरकात जातील”. नरकाच्या भीतीने का हाईना लोक शिक्षणाला होकार देऊ लागले.
१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली.
तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.
सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य
भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.
सुरुवातीला
शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या
यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर
सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत .
शिक्षणाच्या
प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी
ओळखले. काही क्रूर रूढी परंपरांनाही त्यांनी आळा घातला. लहानपणीच लग्न झालेल्या
अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. पतीच्या निधनानंतर एकतर
त्यांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन केले जाई. त्यांना कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या
विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणार्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा
विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
ज्योतिरावांनी
या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते
समर्थपणे चालवले. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच
ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.
केशवपन बंद
करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे
सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा
मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतरही (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी
सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या
साहित्याच्या माध्यमातूनही केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही
प्रकाशित करण्यात आली.
इ.स. १८९६
सालातल्या दुष्काळात समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला.
पोटासाठी शरीर विक्रय करणार्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून
त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार
म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
इ.स. १८९६-९७
सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगाच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार
अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने
संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून
उद्भवणारे हाल ओळखून त्यांनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या
माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊ
लागल्या. प्लेगाच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १०, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
!!◆◆मराठी
भाषण◆◆!!
रूप तियेचे करी विच्छिन्न
नकोसे केले तिजला त्याने
शोषून काढी मध तियेचा
चिपाड केले तिला तयाने
नकोसे केले तिजला त्याने
शोषून काढी मध तियेचा
चिपाड केले तिला तयाने
ज्या काळात
स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षांपासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून
स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला
. पुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टी कोण असल्याने , स्वतःचे
व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली.
महारष्ट्रातील महान
समाज सुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय
समाजसुधारणाच्या कार्यात त्यांना खांद्याला खांदा लावून स्त्री – शिक्षण व दलित्धारक
कार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले या सातारा जिल्हातील
शिरवळपासून जवळच असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील याच्या घरी ३ जानेवारी
१८३१ रोजी सावित्री हि कन्या जन्मली . त्याची हि एकुलती
एक लाडकी मुलगी होती. त्या काळात बालविवाहाची परत होती. त्यामुळे सावित्री सात
वर्षाची होताच तिच्यासाठी नवरामुलगा शोधण्यासाठी मोहीम सुरु झाली. शिवाय सावित्री
हाडापेराने मजबूत आणि थोराड असल्याने सावित्रीबाईच्या आई – वडीलांनी मोहीम
जरात सुरु केली. नेवसे पाटील आणि धनकवडीचे पाटील यांचा घरोबा होता. त्यातून
ज्योतिबा बारा वर्षाचे आणि सावित्रीबाई नऊ वर्षाच्या होत्या .
सावित्रीबाई आणि
ज्योतिबा यांना अपत्य नव्हते . त्यांनी यशवंत नावाचा मुलगा आणि त्याच्या
विधवा आईला आपल्या घरी साभाळले. पुढे सावित्रीबाईनी ज्योतीबाशी विचार्मिनय करून
यशवंतलाच दत्तकच घेतले. यशवंतच्या खऱ्या आईला सावित्रीबाईंनी अत्यंत प्रेमाने
वागविले हि त्यांच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष सावित्रीबाईंना बालपणी घरच्याकडून
शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणे त्या काळात शक्यच नव्हते. सावित्रीबाईना मात्र
बालवयापासून शिकावे असे मनातून वाटत होते.
ज्योतिबाबरोबर सावित्रीबाईंना
विवाह झाल्यावर त्यांना तत्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी चालून आली
ज्योतिबाच्याच मानाने स्त्रियांना शिकावे असा विचार केलेला असल्यामुळे त्यांनी
आपल्या पत्नीपासूनच स्त्रीशिक्षणाला आरंभ केला होता. ज्योतीबांच्या वडीलांनी
आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबद्च विरोध प्रकट केला होता. तिथे सुनेच्या शिक्षणाला ते
नकार देतील यात काय आश्चर्य . पण ज्योतीबाच्या मुलींसाठी शाळा काढण्याचा विचार
निश्चित झाला . त्यमुळे त्याचा आरंभ त्यांनी आपल्या पत्नीपासूनच म्हणजे
सावित्रीबाईन पासूनच केला. शेतात करतांनाच झाडाखाली बसून काळ्या मातीत अक्षरे
गिरवत सावित्रीबाई शिकू लागल्या . या मध्ये प्रगती झाल्यावर त्यांनी एका सरकारी
शाळेत प्रवेश घेवून पुढचे शिक्षण चालू ठेवले .
१४ जानेवारी १८४८
साली ज्योतीबांनी पुण्यास मुलींची पहिली शाळा काढली. पण मुलीना शिकवयाचे धाडस
करायला कुणी शिक्षक पुढे येईना . तेव्हा सावित्रीबाई शाळेत जावून मुलीना शिकवू
लागल्या . बाय्कैनी शिकणे हे महापाप . आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी
सर्वच समाज समजत असल्याने, सावित्रीबाई शाळेत मुलीना शिकवायला जाऊ लागल्या की
पुण्यातले अतिकर्मठ लोकं त्याचावर दगड, शेण, चिखल वैगरे फेकीत. पण सावित्रीबाईना या सर्व छळाला
शांतपणे तोंड देवून मुलीना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले . सावित्रीबाई आणि
ज्योतिबा फुले यांनी नंतर दोन शाळा काढल्या . त्या व्यवस्थित चलल्या पुणे येथील हे
शिक्षण कार्य पाहून १९५२ म्स्ध्ये इंग्रज सरकारने फुले पतीपत्नीचा मेजर कॅन्डी यांच्या
हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केला . भारतातल्या
मुलीना पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच
ठेवले.
पण हे सर्व त्या
पतीच्या पावलावर पावूल टाकून अंधपणे करीत नव्हत्या , तर त्या कार्यावर
त्याची निष्टा होती , म्हणून पतीनिधनानतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे ‘समता आंदोलन’ पुढे चालू ठेवले .
सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्याच्या ठायी असणारया कविमनाला जे काही आढलले ते
त्यांनी कविता आणि अभंगाच्या रुपात शब्दबद्ही केले. १८५४ साली
त्याचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह
प्रसिद्ध झाला. ‘मातोश्री
सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी ‘ या नावाने पुस्तकही १८९१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले
. कित्तेक कवितात निसर्गाची मनोरम वर्नेही आलेली आहेत. काव्यलेखनाप्रमाणेच त्यांनी
‘गृहिणी’ या मासिकात लेखही
लिहिले . त्याच्या लेखनाला स्वानुभवाचा भक्कम आधार असल्याने ते लेखन परिणामकारक
झाले आहेत.
सावित्रीबाईनी
ज्योतीबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे
त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथना आश्रय मिळवा हि त्याची कार्यक्षेत्र त्यांच्या
श्रद्धेने प्रभावी झाली . सामजिक कार्यात पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येय होते.
त्यामुळेच १८७६ – ७७
मधल्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली
असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण
झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाने बळी
ठरल्या. आणि १० मार्च १८९७ मध्ये त्यांना मृतू आला. समजातल्या दिन : दलितांना मायेने
जवळ करणाऱ्या, स्त्रियांना
शिक्षण मिळावे म्हणून धडपदनाऱ्या सावित्रीबाई खर्या अर्थाने ज्योतिबाच्या सहचरणी
म्हणून शोभल्या . त्याच्या थोर सामजिक कार्य विषयाची कृतध्नता म्हणून १९९५ पासून ३
जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बलीकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
!!◆◆हिंदी भाषण◆◆!!
सावित्रीबाई फुले (January 3, 1831- March 10,
1897)
देश की पहली महिला अध्यापिका व नारी मुक्ति आंदोलन की पहली नेता.
देश की पहली महिला अध्यापिका व नारी मुक्ति आंदोलन की पहली नेता.
लेकिन एक ऐसी महिला जिन्होंने उन्नीसवीं सदी में छुआ-छूत, सतीप्रथा, बाल-विवाह, तथा विधवा-विवाह
निषेध जैसी कुरीतियां
के विरूद्ध अपने पति के साथ मिलकर काम किया पर उसे हिंदुस्तान ने भुला दिया.ऐसी
महिला को हमारा शत-२
नमन...
सावित्रीबाई फुले देश की पहली महिला अध्यापिका व नारी मुक्ति आंदोलन की पहली नेता थीं, जिन्होंने अपने
सावित्रीबाई फुले देश की पहली महिला अध्यापिका व नारी मुक्ति आंदोलन की पहली नेता थीं, जिन्होंने अपने
पति ज्योतिबा फुले के सहयोग से देश में महिला शिक्षा
की नींव रखी। सावित्रीबाई फुले एक दलित परिवार में
जन्मी महिला थीं, लेकिन उन्होंने उन्नीसवीं
सदी में महिला शिक्षा की शुरुआत के रूप में घोर ब्राह्मणवाद के
वर्चस्व को सीधी चुनौती देने का काम किया था।
उन्नीसवीं सदी में छुआ-छूत, सतीप्रथा, बाल-विवाह, तथा
विधवा-विवाह निषेध जैसी कुरीतियां बुरी तरह से
व्याप्त थीं। उक्त सामाजिक बुराईयां किसी प्रदेश विशेष में
ही सीमित न होकर संपूर्ण भारत में फैल चुकी थीं।
महाराष्ट्र के महान समाज सुधारक, विधवा पुनर्विवाह
आंदोलन के तथा स्त्री
शिक्षा समानता के अगुआ महात्मा ज्योतिबा फुले की धर्मपत्नी सावित्रीबाई ने अपने
पति के सामजिक कार्यों में न केवल हाथ बंटाया बल्कि
अनेक बार उनका मार्ग-दर्शन भी किया। सावित्रीबाई
का जन्म महाराष्ट्र के सतारा जिले में नायगांव नामक
छोटे से गॉव में हुआ।
महात्मा फुले द्वारा अपने जीवन काल में किये गये कार्यों में उनकी धर्मपत्नी सावित्रीबाई का योगदान काफी
महात्मा फुले द्वारा अपने जीवन काल में किये गये कार्यों में उनकी धर्मपत्नी सावित्रीबाई का योगदान काफी
महत्वपूर्ण रहा। लेकिन फुले दंपति के कामों का सही
लेखा-जोखा नहीं किया गया। भारत के पुरूष प्रधान
समाज ने शुरु से ही इस तथ्य को स्वीकार नहीं किया कि
नारी भी मानव है और पुरुष के समान उसमें भी बुद्धि
है एवं उसका भी अपना कोई स्वतंत्र व्यक्तित्व है ।
उन्नीसवीं सदी में भी नारी गुलाम रहकर सामाजिक
व्यवस्था की चक्की
में ही पिसती रही । अज्ञानता के अंधकार, कर्मकांड, वर्णभेद, जात-पात, बाल-विवाह,
मुंडन तथा सतीप्रथा
आदि कुप्रथाओं से सम्पूर्ण नारी जाति ही व्यथित थी। पंडित व धर्मगुरू भी यही कहते
थे,
कि नारी पिता, भाई, पति व बेटे के सहारे बिना जी नहीं सकती। मनु स्मृति
ने तो मानो नारी जाति के
आस्तित्व को ही नष्ट कर दिया था। मनु ने देववाणी के
रूप में नारी को पुरूष की कामवासना पूर्ति का एक
साधन मात्र बताकर पूरी नारी जाति के सम्मान का हनन
करने का ही काम किया। हिंदू-धर्म में नारी की
जितनी अवहेलना हुई उतनी कहीं नहीं हुई। हालांकि सब
धर्मों में नारी का सम्बंध केवल पापों से ही जोड़ा
गया। उस समय नैतिकता का व सास्ंकृतिक मूल्यों का पतन
हो रहा था। हर कुकर्म को धर्म के आवरण से
ढक दिया जाता था। हिंदू शास्त्रों के अनुसार नारी और
शुद्र को विद्या का अधिकार नहीं था और कहा जाता था
कि अगर नारी को शिक्षा मिल जायेगी तो वह कुमार्ग पर
चलेगी, जिससे
घर का सुख-चैन नष्ट हो जायेगा।
ब्राह्मण समाज व अन्य उच्चकुलीन समाज में सतीप्रथा
से जुड़े ऐसे कई उदाहरण हैं, जिनमें अपनी जान
बचाने के लिये सती की जाने वाली स्त्री अगर आग के
बाहर कूदी तो निर्दयता से उसे उठा कर वापिस अग्नि के
हवाले कर दिया जाता
था। अंततः अंग्रेज़ों द्वारा सतीप्रथा पर रोक लगाई गई। इसी तरह से ब्राह्मण समाज
में
बाल-विधवाओं के सिर मुंडवा दिये जाते थे और अपने ही
रिश्तेदारों की वासना की शिकार स्त्री के गर्भवती
होने पर उसे आत्महत्या तक करने के लिये मजबूर किया
जाता था। उसी समय महात्मा फुले ने समाज की
रूढ़ीवादी परम्पराओं से लोहा लेते हुये कन्या
विद्यालय खोले।
भारत में नारी शिक्षा के लिये किये गये पहले प्रयास के रूप में महात्मा फुले ने अपने खेत में आम के वृक्ष के
भारत में नारी शिक्षा के लिये किये गये पहले प्रयास के रूप में महात्मा फुले ने अपने खेत में आम के वृक्ष के
नीचे विद्यालय शुरु किया। यही स्त्री शिक्षा की सबसे
पहली प्रयोगशाला भी थी, जिसमें सगुणाबाई क्षीरसागर
व सावित्री बाई विद्यार्थी थीं। उन्होंने खेत की
मिटटी में टहनियों की कलम बनाकर शिक्षा लेना प्रारंभ किया।
सावित्रीबाई ने देश की पहली भारतीय स्त्री-अध्यापिका
बनने का ऐतिहासिक गौरव हासिल किया। धर्म-
पंडितों
ने उन्हें अश्लील
गालियां दी, धर्म
डुबोने वाली कहा तथा कई लांछन लगाये, यहां तक कि उनपर पत्थर एवं
गोबर तक फेंका गया। भारत में ज्योतिबा तथा सावि़त्री
बाई ने शुद्र एवं स्त्री शिक्षा का आंरभ करके नये युग
की नींव रखी। इसलिये ये दोनों युगपुरुष और युगस्त्री
का गौरव पाने के अधिकारी हुये । दोनों ने मिलकर
‘सत्यशोधक समाज‘ की स्थापना की। इस संस्था की काफी ख्याति हुई और
सावित्रीबाई स्कूल की मुख्य
अध्यापिका के रूप में नियुक्त र्हुइं। फूले दंपति ने
1851 मंे
पुणे के रास्ता पेठ में लडकियों का दूसरा स्कूल
खोला और 15 मार्च 1852 में बताल पेठ में लडकियों का तीसरा स्कूल खोला। उनकी
बनाई हुई संस्था
‘सत्यशोधक
समाज‘ ने
1876 व 1879 के अकाल में अन्नसत्र
चलाये और अन्न इकटठा करके आश्रम में रहने
वाले 2000 बच्चों को खाना खिलाने की व्यवस्था की। 28 जनवरी 1853 को बाल हत्या
प्रतिबंधक गृह की
स्थापना की, जिसमें कई विधवाओं की प्रसूति हुई व बच्चों को बचाया
गया। सावित्रीबाई द्वारा तब विधवा
पुनर्विवाह सभा का आयोजन किया जाता था। जिसमें नारी
सम्बन्धी समस्याओं का समाधान भी किया जाता
था। महात्मा ज्योतिबा फुले की मृत्यु सन् 1890 में हुई। तब
सावित्रीबाई ने उनके अधूरे कार्यों को पूरा करने के
लिये संकल्प लिया।
सावित्रीबाई की मृत्यु 10 मार्च 1897 को प्लेग के मरीजांे की देखभाल करने के दौरान हुयी।
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
!!◆◆इंग्रजी भाषण◆◆!!
Savitribai
Jotiba Phule (January 3, 1831- March 10, 1897) was a social reformer who
along
with her husband, Mahatma Jotiba Phule played an important role in
improving
women's
rights in India during the British Rule.
Savitribai
was the first female teacher of the first women's school in India and also
considered
as the pioneer of modern Marathi poetry. In 1852 she opened a school for
Untouchable
girls.
Mahatma
Jyotiba is regarded as one of the most important figures in social reform
movement
in Maharashtra and India. He is most known for his efforts to educate women
and
the lower castes. Jyotirao, then called as Jyotiba was Savitribai’s mentor
and
supporter.
Under his influence Savitribai had taken women’s education and their
liberation
from the cultural patterns of the male-dominated society as mission of her
life.
She worked towards tackling some of the then major social problems including
women’s
liberation, widow remarriages and removal of untouchability.
However,
apart from all these oppositions, Savitribai yet continued to teach the girls
.
Whenever Savitribai went out of her house, groups of orthodox men would follow
her
and
abuse her in obscene language. They would throw rotten eggs, cow dung, tomatoes
and
stones at her. She would walk meekly and arrive at her school. Fed up with the
treatment
meted out to her, she even decided to give up. But it was because of her
husband
that she continued with her efforts. He told Savitribai Jyotiba who was
working
for women's education had started the first girl’s school and required women
teachers
to assist him. Jyotiba educated and trained Savitribai, his first and ideal
candidate
for this job of a teacher. Savitribai and Jyotiba faced fierce resistance
from
the
orthodox elements of society for this. Jyotiba sent her to a training school
from
where
she passed out with flying colours along with a Muslim lady Fatima Sheikh.
When
Savitribai completed her studies, she, along with her husband, started a school
for
girls in Pune in 1848. Nine girls, belonging to different castes enrolled
themselves
as
students.
Slowly
and steadily, she established herself. Jyotiba and Savitribai managed to open 5
more
schools in the year 1848 itself. She was ultimately honoured by the British
for
her
educational work. In 1852 Jyotiba and Savitribai were felicitated and
presented
with a
shawl each by the government for their commendable efforts in Vishrambag Wada.
The next
step was equally revolutionary. During those days marriages were arranged
between
young girls and old men. Men used to die of old age or some sickness and
the
girls
they had married were left widows. Thus, widows were not expected to use
cosmetics
or to look beautiful. Their heads were shaved and the widows were
compelled
by society to lead an ascetic life.
Savitribai
and Jyotiba were moved by the plight of such widows and castigated the
barbers.
They organized a strike of barbers and persuaded them not to shave the
heads
of
widows. This was the first strike of its kind. They also fought against all
forms of
social
prejudices. They were moved to see the untouchables who were refused
drinking
water meant for the upper caste. Both Jyotiba and Savitribai opened up their
reservoir
of water to the untouchables in the precincts of their house.
Savitribai
was not only involved in educational activities of Jyotirao but also in every
social
struggle that he launched. Once Jyotiba stopped a pregnant lady from
committing
suicide, promising her to give her child his name after it was born.
Savitribai
readily accepted the lady in her house and willingly assured to help her
deliver
the child. Savitribai and Jyotiba later on adopted this child who then grew up
to
become
a doctor and after Jyotiba's death, lit his pyre and completed his duties as a
rightful
son. This incident opened new horizons for the couple. They thought of
the
plight
of widows in Hindu society. Many women were driven to commit suicide by men
who
had exploited them to satisfy their lust and then deserted them. Therefore,
Savitribai
and Jyotiba put boards on streets about the "Delivery Home" for women
on
whom
pregnancy had been forced. The delivery home was called "Balhatya
Pratibandhak
Griha".
Jyotiba
and Savitribai were also opposed to idolatry and championed the cause of
peasants
and workers. They faced social isolation and vicious attacks from people
whom
they questioned. After his demise, Savitribai took over the responsibility of
Satya
Shodhak Samaj, founded by Jyotiba. She presided over meetings and guided
workers.
In 1868
she welcomed untouchables to take water from her well.
She
worked relentlessly for the victims of plague, where she organized camps for
poor
children.
It is said that she used to feed two thousand children every day during
the
epidemic.
She herself was struck by the disease while nursing a sick child and died on
10
March 1897.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
सावित्रीबाई फुले
यांच्यावर लहान मुलीने केलेलेप्रभावी भाषण बघण्यासाठी खाली क्लिक करा
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
!!◆◆सावित्रीबाई फुले
यांच्यावर कविता ◆◆!!
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
एरव्ही बोललेही नसते,
पण माझ्या विचारांचे
तुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय.
चक्क माझी देवी बनवून
मला फोटोमध्ये फ्रेम केलेय.
जमेल तेंव्हा,जमेल तसे
माझे सोईनुसार कौतुक करता.
खरे दु:ख याचे की,
तुम्ही मला गृहित धरता.
त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
कुर्हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा,
सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात.
ज्या माझ्या वारसा सांगतात,
त्याच बेईमान झाल्यात.
असे होईल,मला काय माहित?
मला कुठे पुढचे दिसले होते?
एका वेगळ्या जगासाठी
मी शिव्याशाप,
दगडाबरोबर शेणही सोसले होते.
तुमच्याच शब्दात सांगायचे तर
रात्रंदिवस घासले होते.
आज मी कसले घाव झेलतेय?
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
ही काही उपकाराची भाषा नाही.
आजच्या बाजारू समाजसेवेसारखा
हा बेंडबाजा अगर ताशा नाही.
मी विसरून गेले होते,
आम्ही कोणकोणते विष पचवले आहे.
हल्ली मात्र तुम्ही
आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे.
म्हनूनच तुमच्या बहिर्या कानी
हे गार्हाणे घालतेय.
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
माय मावल्यांनो,लेकीबाळींनो.
तुम्ही शिकलात सवरलात.
पण नको तेवढ्या शहाण्या झालात.
विकृत स्त्रीमुक्तीच्या
प्रत्येकजणी कहाण्या झालात.
माझा वारसा सांगून,
स्वार्थासाठी राबता आहात.
या सगळ्या संतापापुढे
आज मी भिड्भाड भुलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
बाईपणाचे दु:ख काय असते?
मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय.
आरशात पाहून सांगा,
मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय?
तकलादू आणि भंपक
स्त्रीमुक्तेची नशा
तुम्हांला आज चढली आहे.
कपडे बदलेले की,
पुरोगामी होता येते,
ही फॅशन तुम्ही पाडली आहे.
शिकली सवरलेली माझी लेक
संस्कृतीच्या नावाखाली
नाकाने कांदे सोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
मान नको,पान नको,
आमचे उपकारही फेडू नका.
किर्तन-बिर्तन काही नको
झोडायची म्हनून
भाषणंही झोडू नका.
वाघिणीचे दूध पिऊन
कुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात.
धर्म-संस्काराच्या नावाखाली
टाकाऊ परंपरा पाळीत आहात.
तुमच्या चिपाडलेल्या डोळ्यात
म्हनूनच हे अंजन घालतेय...
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
तुम्हांला आज
काहीसुद्धा सोसायचे नाही.
काढणारे काढीत आहेत
तुम्हांला शाळा काढीत बसायचे नाही.
तुम्ही फक्त पुरोगामित्त्वाचा
खरा वसा घ्यायला पाहिजे.
एखादा दुसरा ’यशवंत’ शोधून
त्याला आधार द्यायला पाहिजे,
शाळा कॉलेजचे पिक तर
हायब्रिडसारखे डोलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
मनमानी आणि स्वैराचाराला
पुरोगामित्त्वाचे लेबल लावणे,
यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही.
फक्त नवरे बदलणे,
घटस्फोट घेणे,
ही काही स्त्रीमुक्ती नाही.
माझी खरी लेक तीच,
जी सत्यापूढे झुकत नाही.
सावित्री आणि ज्योतिबांपूढे
आंधळेपणाने माथा टेकत नाही.
माझी खरी लेक तीच,
आम्हांलासुद्धा नव्याने तपासून
स्वत:ची भाषा बोलतेय.
आमचाही वसा
तावून-सुलाखुन पेलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
आमच्याच मातीत,
आमच्याच लेकरांकडून
दूजाभाव बघावा लागला.
माझा फोटो लावण्यासाठीही
सरकारी जी.आर.निघावा लागला.
आपल्या सोईचे नसले की,
विचारांकडेही कानाडॊळा होतो.
समाजासाठी काही करायचे म्हटले की,
पोटात प्लेगचा गोळा येतो.
ज्योतिबांशिवाय सावित्री,
सावित्रीशिवाय ज्योतिबा,
समजून घेता येणार नाही.
विचारांची ही ज्योती,
एकटी-एकटी नेता येणार नाही.
सुनांना लागावे म्हणून तर
लेकींनो, तुम्हांला बोलतेय....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय...
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबा.9923847269
-----------------------
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबा.9923847269
-----------------------
★★★★★★★★★★★★★★★★★★★
क।वि।ता
ReplyDelete----------------
होय,
मी सावित्री
ज्योतिबा फुले बोलतेय....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
एरव्ही बोललेही नसते,
पण माझ्या विचारांचे
तुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय.
चक्क माझी देवी बनवून
मला फोटोमध्ये फ्रेम केलेय.
जमेल तेंव्हा,जमेल तसे
माझे सोईनुसार कौतुक करता.
खरे दु:ख याचे की,
तुम्ही मला गृहित धरता.
त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
कुर्हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा,
सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात.
ज्या माझ्या वारसा सांगतात,
त्याच बेईमान झाल्यात.
असे होईल,मला काय माहित?
मला कुठे पुढचे दिसले होते?
एका वेगळ्या जगासाठी
मी शिव्याशाप,
दगडाबरोबर शेणही सोसले होते.
तुमच्याच शब्दात सांगायचे तर
रात्रंदिवस घासले होते.
आज मी कसले घाव झेलतेय?
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
ही कही उपकाराची भाषा नाही.
आजच्या बाजारू समाजसेवेसारखा
हा बेंडबाजा अगर ताशा नाही.
मी विसरून गेले होते,
आम्ही कोणकोणते विष पचवले आहे.
हल्ली मात्र तुम्ही
आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे.
म्हनूनच तुमच्या बहिर्या कानी
हे गार्हाणे घालतेय.
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
माय मावल्यांनो,लेकीबाळींनो.
तुम्ही शिकलात सवरलात.
पण नको तेवढ्या शहाण्या झालात.
विकृत स्त्रीमुक्तीच्या
प्रत्येकजणी कहाण्या झालात.
माझा वारसा सांगून,
स्वार्थासाठी राबता आहात.
या सगळ्या संतापापुढे
आज मी भिड्भाड भुलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
बाईपणाचे दु:ख काय असते?
मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय.
आरशात पाहून सांगा,
मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय?
तकलादू आणि भंपक
स्त्रीमुक्तेची नशा
तुम्हांला आज चढली आहे.
कपडे बदलेले की,
पुरोगामी होता येते,
ही फॅशन तुम्ही पाडली आहे.
शिकली सवरलेली माझी लेक
संस्कृतीच्या नावाखाली
नाकाने कांदे सोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
मान नको,पान नको,
आमचे उपकारही फेडू नका.
किर्तन-बिर्तन काही नको
झोडायची म्हनून
भाषणंही झोडू नका.
वाघिणीचे दूध पिऊन
कुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात.
धर्म-संस्काराच्या नावाखाली
टाकाऊ परंपरा पाळीत आहात.
तुमच्या चिपाडलेल्या डोळ्यात
म्हनून हे अंजन घालतेय...
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
तुम्हांला आज
काहीसुद्धा सोसायचे नाही.
काढणारे काढीत आहेत
तुम्हांला शाळा काढीत बसायचे नाही.
तुम्ही फक्त पुरोगामित्त्वाचा
खरा वसा घ्यायला पाहिजे.
एखादा दुसरा ’यशवंत’ शोधून
त्याला आधार द्यायला पाहिजे,
शाळा कॉलेजचे पिक तर
हायब्रिडसारखे डोलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
मनमानी आणि स्वैराचाराला
पुरोगामित्त्वाचे लेबल लावणे,
यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही.
फक्त नवरे बदलणे,
घटस्फोट घेणे,
ही काही स्त्रीमुक्ती नाही.
माझी खरी लेक तीच,
जी असत्यापूढे झुकत नाही.
सावित्री आणि ज्योतिबांपूढे
आंधळेपणाने माथा टेकत नाही.
माझी खरी लेक तीच,
आम्हांलासुद्धा नव्याने तपासून
स्वत:ची भाषा बोलतेय.
आमचाही वसा
तावून-सुलाखुन पेलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
आमच्याच मातीत,
आमच्याच लेकरांकडून
दूजाभाव बघावा लागला.
माझा फोटो लावण्यासाठीही
सरकारी जी.आर.निघावा लागला.
आपल्या सोईचे नसले की,
विचारांकडेही कानाडॊळा होतो.
समाजासाठी काही करायचे म्हटले की,
पोटात प्लेगचा गोळा येतो.
ज्योतिबांशिवाय सावित्री,
सावित्रीशिवाय ज्योतिबा,
समजून घेता येणार नाही.
विचारांची ही ज्योती,
एकटी-एकटी नेता येणार नाही.
सुनांना लागावे म्हणून तर
लेकींनो, तुम्हांला बोलतेय....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय...
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबा.9923847269
--------------------------------
पूर्वप्रसिद्धी-
दैनिक पुण्यनगरी
एक विनंती- सदरील कविता गेल्या अनेक वर्षांपासून
सोशल मीडिया वर निनावी पोस्ट होत असल्याचे दिसून आले आहे.आपल्या निदर्शनास असे आले तर तिथे लक्षात आणून द्यावे)
Sir....really I appreciate your efforts in the field of Education
ReplyDeleteखूपच छान माहिती thank you for sharing हे पण वाचा > सावित्रीबाई फुले जयंतीनिमित निबंध भाषण मराठी मध्ये माहिती !
ReplyDeletesavitribai phule marathi speech sathi upyukt mahiti Dhanyawad
ReplyDelete