सुंदर मराठी
शुद्धलेखनाचे अठरा
नियम
अनुस्वारासंबंधीचे
नियम
नियम १: स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल
शीर्षबिंदू द्यावा.
उदा- आंबा, चिंच,
तंटा, गंगा, निबंध, आनंद
नियम २: य,व,र,ल,श,ष,स,
ह, क्ष,ज्ञ यांच्यापूर्वी येणा-या अनुस्वारांबद्दल संस्कृतप्रमाणे शीर्षबिंदू द्यावा.
उदा-संयम, संवाद,
संरक्षण, संलग्न, वंशज, दंश, संसार, कंस, सिंह, संक्षिप्त, संज्ञा.
नियम ३: नामांच्या व
सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरुपांवर विभक्तिप्रत्यय लावताना व शब्दयोगी अव्यय
लावताना अनुस्वार द्यावा.
उदा- लोकांना,
मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे, देशांत, त्यांना, त्यांच्यामुळे.
उपनियम ३: आदरार्थी
बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे.
उदा- राज्यपालांचे,
आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे.
नियम ४: वरील नियमांव्यतिरिक्त
कोणत्याही कारणांसाठी व्युत्पनीने सिद्ध होणारे व न होणारे अनुस्वार देऊ नयेत.
उदा- गांव, नांव,
घरें यावर अनुस्वार देऊ नयेत.
गाव, नाव, घरे असे लिहावे.
र्हस्व दीर्घ
संबंधी नियम
(ज्याचा उच्चार
चटकन,कमी वेळेत होतो.तेथे र्हस्व उच्चार करावा.)
नियम ५: तत्सम
(संस्कृत) र्हस्व इकारान्त आणि उ-कारान्त शब्द प्रथमेत दीर्घान्त लिहावेत.
उदा- कवी, वायू,
मृत्यू, शक्ती, भक्ती, उक्ती, गती, मती, शत्रू, बुद्धी,गती
उपनियम ५ एक अक्षरी
शब्द दीर्घ लिहावेत.
उदा- मी, ती, ही,
जी, की, तू, जू,
अपवाद- आणि , नि, कदापि, परंतु, तथापि, यथामति ही
र्हस्व लिहावीत.
उपनियम ५- परंतु
सामासिक शब्दांमध्ये तत्सम र्हस्व इ-कारान्त शब्द व उ-कारान्त शब्द प्रथमपदी
आल्यास र्हस्व लिहावेत.
उदा- कवी- कविराज,राजकवी,
भक्ती- भक्तिभाव, मृत्यू-मृत्युंजय, मती-मतिमंद, गती-गतिमान.
नियम ६: मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यातील उपान्त्य इकार
किंवा उकार र्हस्व लिहावेत.
उदा- किती,चिनी,विटी, सुरु , गुरु, पुढी, गुढी,
अतिथी
अपवाद- नीती, रीती, भीती, प्रीती, सुनीता, सुनील,
उपनियम ६:
रफारापूर्वी येणारे इकार व उकार दीर्घ
लिहावेत.
उदा- कीर्ती, मूर्ती, तीर्थ, स्फूर्ती,
मूर्ती.
नियम ७: अ-कारान्त शब्दांचे उपान्त्य इ-कार व
उ-कार दीर्घ लिहावेत.
उदा- गरीब, चाळीस, वकील, माहीत, जमीन, फूल, चूल,
भूल, मूळ, चाहूल, सून, वसूल, लसून, गुण, ऊस,
बहीण,खीर,तूप,गीत,शूर,शून्य,
अपवाद: मंदिर, विष, विश्व, प्रिय, अधिक, विपुल,
नाजुक, चतुर, अरुण, तरुण, अखिल, सुख, शुभ, रुंद, अतुल,मित्र, पुण्य.
उपनियम ७: तत्सम
शब्दांतील इकारयुक्त व उकारयुक्त अक्षरांवर अनुस्वार असल्यास ती अक्षरे सामान्यत: र्हस्व लिहावेत.
उदा: चिंच, लिंबू, तुरुंग, लिंग, बिंदू, अरविंद,
छि:, थु:, दु:ख, नि:शस्त्र
नियम ८: उपान्त्य दीर्घ ई-ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य इकार,उकार अभयवचनी
सामान्य रुपांच्या वेळी र्हस्व लिहावेत.
उदा: गरीब-
गरिबाचे, सून-सुनेचे, वडील- वडिलांचे, वकील-वकिलासाठी, जमीन- जमिनीपासून, फूल-
फुलांना,मूल-मुलांसाठी,
अपवाद: शरीर-शरीराचे,
गीता-गीतेत, सूत्र-सूत्रात, पूजा- पूजेकरिता, परीक्षा- परीक्षक, वधू परीक्षा.
किरकोळ नियम:
नियम ९: ‘पूर’ हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना यातील
‘पू’ दीर्घ लिहावा
उदा: कोल्हापूर,
नागपूर,सोलापूर कोल्हापुरला
नियम १०: कोणता, एखादा, असे शब्द लिहावेत. कोणचा, एकादा, असे शब्द लिहू नयेत.
नियम ११: हळूहळू, चिरीमिरी,मुळूमुळू यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरे व
चौथे अक्षरे दीर्घान्त लिहावीत.
नियम १२: ‘पूर’ ए-कारान्त नामांचे सामान्यरुप या-कारान्त करावे.
उदा- फडके-
फडक्यांना, करणे- करण्यांसाठी
नियम १३: लेखनात पात्राच्या किंवा वक्त्यांच्या तोंडी बोलण्याची भाषा वापरावी
लागते.त्यावेळी तिचे स्वरुप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे, अन्य व प्रसंगी तसे
लिहू नये.
उदा- तिचं
बोलणं आवडलं.
नियम १४: कोणत्याही अंत्याक्षराचा पाय मोडू नये.
उदा:विदवान,
भगवान,
अपवाद- अन्
नियम १५: केशवसूत पूर्वकालीन व विष्णू शास्त्री चिपूळणकर पूर्वकालीन गदय
यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत. तदनंतरचे मराठी साहित्य महामंडळाच्या
प्रस्तुत लेखनविषयक नियमांस अनुसरुन छापावे.
नियम १६: ‘राहणे, पाहणे, वाहणे, अशी रुपे वापरावीत.रहाणे,पहाणे, वहाणे, अशी
रुपे वापरु नयेत.आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र राहा,पाहा, वाहा,याबरोबरच रहा,
पहा, वहा, अशी रुपे वापरण्यासा हरकत नाही.
नियम १७: ‘ही’ हे अव्यय तसेच ‘आदी’ व ‘ इत्यादी’ ही विशेषणे दीर्घान्तच लिहावीत.
नियम १८: ‘पदयात वृत्ताचे बंधन पाळताना
र्हस्व दीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास
कवीला तेवढयापुरते स्वातंत्रय असावे.
No comments:
Post a Comment