-- पृथ्वीचे शोकगीत --
* संगीत रचना - अशोक वायगणकर
* गीत - विलास जैतापकर
हा नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे
ही वसुंधरा जनसंखेच्या भाराने रडते आहे ||धृ||
पृथ्वीच्या
पाठीवरती ही अफाट झाली गर्दी
गर्दीतच जन गुदमरती, दु :खात किती तळमळती
हे संततीचे अज्ञान जगाला भेसूर छळते आहे ||१||
गर्दीतच जन गुदमरती, दु :खात किती तळमळती
हे संततीचे अज्ञान जगाला भेसूर छळते आहे ||१||
या
नद्या नव्हे रे गंगा संजीवन तुजला देती
तू करुनी जल अपवित्र का पाप घेतसे माथी
हे पात्र नद्यांचे सुखमय कर दुसरीकडे वळते आहे ||२||
तू करुनी जल अपवित्र का पाप घेतसे माथी
हे पात्र नद्यांचे सुखमय कर दुसरीकडे वळते आहे ||२||
हा
पावन निर्मल वारा, जो श्वास तुझा रे होतो
तू दूषित करुनी त्याला, विश्वास कसा गमवितो
हे दु :ख अनावर धरणीला रे अविरत सलते आहे ||३||
तू दूषित करुनी त्याला, विश्वास कसा गमवितो
हे दु :ख अनावर धरणीला रे अविरत सलते आहे ||३||
ही
झाडे तुजला देती रे उन्हात शीतल छाया
अन मधुर फळे पुरविती रे जीव तुझा जगवाया
हि कुरहाड झाडांवरती नाही तुजवर पडते आहे ||४||
अन मधुर फळे पुरविती रे जीव तुझा जगवाया
हि कुरहाड झाडांवरती नाही तुजवर पडते आहे ||४||
ही
पुन्हा हसावी धरणी, पक्ष्यांनी गावी गाणी
धावे कर्तव्य म्हणुनी, ही बिरादरी इन्सानी
या अभियानात सामील व्हा, ज्यांना हे कळते आहे ||५||
धावे कर्तव्य म्हणुनी, ही बिरादरी इन्सानी
या अभियानात सामील व्हा, ज्यांना हे कळते आहे ||५||